Saturday, 20 September 2025

'अतुल'नीय - #अनुभूति

'अतुल'नीय - #अनुभूति" 
शरद जयश्री कमळाकर चव्हाण

जेव्हा मोबाईल सराईत झालेले नव्हते तेव्हा बस व रेल्वे प्रवासामध्ये हमखास पुस्तके माझ्या सोबत असायची. ठरवून त्या त्या प्रवासामध्ये कोणते पुस्तक वाचायचे ह्याची पण यादी असायची. 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य करत असताना महिन्यातील किमान पंधरा दिवस प्रवासामध्ये नक्की जायचे. त्या प्रवासात 200+ पानांची अनेक पुस्तके वाचून काढलेली आठवतात.
2015 नंतर वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाच्या निमित्त्याने प्रवास व्हायचा परंतु या प्रवासात पुस्तके हळूहळू बॅगेतच विराम करायल लागली. पुस्तकाची जागा मोबाईल ने घेतली आणि वाचना ऐवजी लिखाणाची गती आणि प्रगती वाढली प्रगती म्हणून काही लेख माझ्या नावावर जमा होवू लागले. तरी सवयीनुसार एक-दोन पुस्तके नाममात्र सोबत करायची.  बदल इतकाच झाला की पूर्वी पुस्तकांचे खंड वाचून व्हायचे आता छोट्या पानांची पुस्तके ही वाचून पूर्ण होत नाहीत... असो....
....कालच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची प्रांत संघटन मंत्री बैठक संपवून रांची हून सिलिगुडीला बसने निघालो.  
थोडा वेळ मोबाईलमय झालो. बरेच दिवसांनी निसर्गाची चित्रे काढली. त्यात मोबाईलची बॅटरी दिचार्ज झाली त्यात पुन्हा प्राण येईपर्यंत ' कम्पल्सरी' विकत घ्याव लागलेले नवीन पुस्तक बाहेर काढले.
संध्याकाळी बसच्या गती नुसार आणि अंधुक प्रकाशात वाचायला घेतलेले 120 पानांचे पुस्तक रात्री 12 च्या ठोक्याला पूर्ण झाले. बरेच दिवसानंतर पूर्वी अनुभवलेली पुस्तक वाचण्याची धुंदी, त्यातील रेखाटलेले प्रसंग, लिखाण ह्यावर थांबून थांबून विचार करायला भाग पाडणारी तंद्री, वर्तमान पुस्तकातून प्रकटलेल्या व्यक्ती, आठवणी, प्रसंग तद्रुप होऊन गत स्मृतींच्या पाना पानांत दडलेल्या असंख्य खाणा खुणा, बुकमार्क, पिंपळपाने नकळत जागृत झाली.
सकारात्मक ऊर्जा, सामाजिक बांधिलकी, निःस्वार्थ सेवा करणारी संस्कारित मने आणि देव दुर्लभ कार्यकर्ते जणू आपल्या समोर एकामागून एक साकार होत असल्याचा प्रत्यय आला. 
आपण स्वीकारलेले व्रत नियमा प्रमाणे सुरू आहे ना? असा प्रश्न विचारणारी, नवीन ऊर्जा देणारी एक वेगळीच अनुभूति ह्या पुस्तकाच्या माध्यमातून साकारली जात आहे असा अनुभव हे पुस्तक संपविताना लक्षात आला. 
हे ही लक्षात आले की बरेच दिवसानंतर सुंदर अशी एक आनंदाची, तृप्तीची "अनुभूति" या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला मिळालेली आहे.
मुखपृष्ठावर वॉटर मार्क स्वरूपात दिसणाऱ्या वृक्षांच्या पृष्ठभूमीवर हाताने साकारलेल्या ठळक अक्षरातील पुस्तकाचं नाव
"#अनुभूति" कळत नकळत त्याला झालेला मानवी कॅलिग्राफी स्पर्श, त्यातील भावभावनांशी आपणाला सहज जोडतो.
पुस्तक शीर्षकाच्या वर लोगोच्या रुपात आपणाला दिसतो;
धनुष्यधारी बालक, उगवता सूर्य आणि त्याखाली उमटलेली ' तू मैं एक रक्त' ही अक्षरे
माती रंगाच्या गवाक्षावर गोंदवलेला हा लोगो जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या गेल्या 75 वर्षाच्या कार्याची मोहर आहे हे वेगळे सांगायला नको.
त्या मुळे आतील सारी अनुभूती ही जल, जमीन, जंगल, जनजाती क्षेत्रातील असणार हे ही अधोरेखित होते.
खाली प्रकाशकाचा लोगो आणि 'अतुल जोग' अर्थात लेखकाचे नाव !
मल पृष्ठावर पुस्तक संदर्भ, त्यात काय आहे याची थोडक्यात छापलेली प्रस्तावना आणि ज्यांनी हे लिहिलेलं आहे त्या अतुल जोग यांचा संक्षिप्त परिचय. 
सहज सुन्दर अशा हिंदी भाषेतील हे पुस्तक वाचताना, समजून उमजून मनाचा ठाव कधी घेते हे समजतच नाही ! 
प्रकाशक तितकाच दर्जेदार लाभलेला आहे दिल्लीतील प्रभात प्रकाशन हे नाव नवनवीन कल्पना व नवीन लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी साहित्य क्षेत्रात आदराने घेतले जाते.
वर्तमान विक्री प्रणालीशी जोडणारी e संरचना आणि हो पुस्तक विकत घ्यायचे असेल तर 250 रुपयात 120 पानांचे हे पुस्तक कुठे? कसे? उपलब्ध होणार ते ही मल पृष्ठावर अधोरेखित केलेले आहे.

सहज शेवटचं पान उलटल्यानंतर सहा ओळींचा समारोप आपणाला पाहायला मिळतो. त्याच्या पहिल्या दोन ओळी संस्कृत भाषेतील एक श्लोक आहे. ज्याचा मतितार्थ उर्वरित चार ओळीत सांगितलेला आहे "एखादी वस्तू आश्चर्यरित्या पाहून, ऐकून अथवा आश्चर्यरित्या प्रसारित करून ही शेवटी आश्चर्य व्यापून राहते तेच विस्मयकारक आश्चर्य होय. त्यानंतर 
शेवट ' ऐसा मेरा मित्र रामथंगा एक अवलिया था' ....
...... खरंतर हा शेवट; उत्सुकता म्हणून पुस्तकाचा आहे की कोणत्या प्रकरणाचा आहे याचा तपास केल्यानंतर लक्षात आलं की हे सलग कथा कादंबरी सारखं पुस्तक नाही तर छोट्या छोट्या कथा स्वरूप व्यक्ती दर्शनाची 37 सुवर्णपृष्टे आहेत.
त्यातील हा रामथंगा 117 पानापासून 120 पानापर्यंत व्यापलेला आहे ज्यात मिजो जनजातीमधील हा युवक मिजो भाषेत रामायण भाषांतरित करत होता बरोबरीने हिंदी, संस्कृत, खासी, उर्दू, फारशी या भाषेंचाही अभ्यासक होऊन त्या त्या भाषेचा उपयोग आपला स्वधर्म टिकवण्यासाठी उपयोगात आणत होता. अवघ्या 45 व्या वर्षी देवाला प्रिय झालेला रामथंगा हा मिजो जातीतील हिरा होता असे लेखकाला वाटते.
 
हे प्रकरण वाचून झाल्यानंतर कळतं नकळत उलट्या क्रमांकाने प्रकरणे वाचत गेलो ते अगदी 26 नंबर पर्यंत.... 
"काश हमारे ऑस्ट्रेलिया मे भी वनवासी कल्याण आश्रम जेसी संस्था होती"..
मग लक्षात आलं की ही ' नापाक' उलटी वाचन संस्कृती आपण का स्वीकारली परंतु वर म्हटल्याप्रमाणे पुस्तकच इतके सजीव झालेले आहे की ते पहिल्या क्रमांकापासून वाचा किंवा शेवटच्या क्रमाने वाचा तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार हे नक्की !
...चूक लक्षात येऊन मग पुस्तक सरळ केले म्हणजे प्रकाशक, प्रस्तावना, अनुक्रमणिका, आणि विषय प्रवेश ह्यातील प्रस्तावना, लेखकाचे मनोगत आणि प्रकरण पहिले यावर शेवटी भाष्य करणे अधिक संयुक्तिक ठरेल. असे मला वाटते.

....तर उलट्या क्रमाने 26 पर्यंत कथा वाचल्यानंतर पहिल्यापासून प्रकरणं वाचण्यास सुरू केली आणि मग लक्षात आलं की, "#अनुभूति" हे पुस्तक लिहिणारे अतुल जोग यांचा तर आपला निकटचा परिचय आहे परंतु तो एक कुशल संघटक, संघटन प्रमुख, मित्र, मार्गदर्शक व वक्ता या नात्याने परंतु गेली तीस वर्षे ते ज्या क्षेत्रामध्ये राहिले, वावरले विशेष करून उत्तर पूर्वांचलातील सात राज्यात त्यातही नागभूमी हे त्यांचे प्रारंभीचे कार्यक्षेत्र राहिले तिथून सुरू झालेला प्रवास, तिथे भेटलेल्या व्यक्ती या वेष परिवेश, दिसायला, सामाजिक आर्थिक दृष्ट्या सामान्य स्तराच्या होत्या परंतु त्यांनी काही प्रसंगी अथवा वेळोवेळी दाखवलेल्या असामान्य गुणांची दखल संवेदनशील अशा कार्यकर्ता रूपातील अतुलजीनी टिपली ती स्पंदने लेखक म्हणून तंतोतंत अवतरली तेच हे #अनुभूति पुस्तक होय.
त्या मुळे ह्या पुस्तकाचा अनुभव कालखंड स्वाभाविकपणे हा 1994 ते 2025 असा आहे आणि मुख्य चौकट ही पूर्वांचल क्षेत्र म्हणजेच 7sister राज्य आणि सिक्किम आहे.  

#अनुभूति वाचताना लक्षात येते की केवळ 37 माणसांचे हे व्यक्ती चित्र नाही तर 37 बरोबर आणखी काही माणसांच्या स्वभाव विशेषाची, गुणांची अथवा कठीण प्रसंगी दाखवलेल्या धीरोदत्तपणाची, प्रत्यक्ष आलेल्या प्रसंगाला, नित्य जीवनाशी दोन हात करून, धैर्याने, अनुपम अशा व्यवहार व कार्य पद्धतीने सामान्यातील असामान्यत्व जिथे जिथे प्रकट झालेलं आहे त्या व्यक्ती व स्थानाचा मागोवा घेणारे हे पुस्तक आहे.
🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते.... 
भारतातील वेगवेगळ्या स्थानातील, परंतु ध्येयाने एकत्रित बांधलेल्या एकरूप व्यक्ती समूहाचे.. त्यातील कार्यकर्ता पणाचे...
प्रकरण 8, 12, 13, 19, 34 मध्ये आपणाला हे जाणवते.

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते....
त्या त्या स्थानी असलेल्या निसर्गाच्या आणि तेथील माणसांच्या परस्पर सहजीवनाचे...
प्रकरण 4, 6, 7, 12, 17, 20, 30 उदाहरणेच उदाहरणे आहेत.

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते...
विदेशातील व्यक्ती भारताच्या बाबतीमध्ये काय विचार करतो किंवा त्याला भारताकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि तो ते स्पष्टपणे वेळ पडल्यानंतर मांडतो त्याचे..
प्रकरण 5, 9, 17, 24, 25, 26

प्रकरण 24 में 'भारत की भारतीयता को बचाइए' जिसमें अमेरिका से आई इवेट रेसर दीमापुर में जनजाति द्वारा किए गए स्वागत के प्रति उत्तर में जो कहती है । जो लेखक ने लिखा है वह भारत के चिती की पहचान है । लेखक लिखता है ' इवेट रेसर जिसे रामरानी भी बुलाते थे उसने बताया, "मैं यहां प्रारंभ में आपसे क्षमा मांगती हूं क्योंकि हमारे देश से आए अमेरिकी मिशनरीयों ने आपके समाज को, नागालैंड को धर्मांतरित करने का प्रयास किया. यह हमारी बड़ी भारी भूल हुई. दूसरी बात यहां आकर मैंने अनुभव किया कि आप पिछड़े नहीं है और हम प्रगत नहीं है । आपकी माता बहने इतनी सुंदर कपड़ों की बुनाई आज भी हाथ से करती है । हमारी अमेरिकी महिला हाथ से बुनाई नहीं कर सकती क्योंकि हमारा समाज मशीनों पर निर्भर हो गया है ।
दुर्दैवाने त्याच वेळेस हे 
पुस्तक #अनुभूति देऊन जात ते.....
आपण स्वतःला विसरत चालल्याचे, दुर्बलतेचे प्रतीक झाल्याचे, भारतातीलच आपल्या बांधवांना विदेशी समजण्याचे त्यांना विसरण्याचे, स्वभाषा, स्वजन व स्वकर्तृत्व हरवण्याचे...
प्रकरण 5, 6, 10, 29, 33
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल पाहताना पूर्वोत्तर भारतातील एका बंधूला विदेशी म्हणून 
भारतीयांसाठी असणारे तिकीट नाकारले जातं तो प्रसंग मन हेलावून सोडतो...

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते...
विविध रूढी परंपरा, विविध नावे, विविध देवता, विविध भाव विश्व परंतु या सर्वांतही वसलेल्या एकात्मिक सूत्रांचे आणि भारतीय अस्मितेच्या रुपात एकमेकांशी जुळलेल्या सुदृढ नात्याचे
प्रकरण 5, 6, 8, 12, 13, 18, 19, 22, 23

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते.... 
स्थानिक भाषा, बोलीभाषा आणि त्या त्या मधील धर्म, संस्कृती, परंपरा जतन करण्याचे स्पुलिंग चेतविणाऱ्यांचे
प्रकरण 3, 5, 22, 28, 37

🏵️  हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते.... 
प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्यास सिद्ध असलेल्या विजीगुशी वृत्तीचे, अंगीकारलेल्या व्रतासाठी सर्वतोपरी संघर्ष करण्याचे, त्यासाठी कंट काकिर्ण जीवन जगण्याचे आणि वेळ पडल्यानंतर हसत हसत मृत्यूला सामोरे जाण्याचे... 
प्रकरण 11, 15, 16, 28
प्रकरण 28 मध्ये बोडो भाषेसाठी बलिदान दिलेल्या श्री. बिनेश्वर ब्रह्मजींच्या बाबतीमध्ये
लेखक लिहितात :
बोडो समाज में भी एक विचार के लोगों ने बोडो भाषा की लिपि बदलकर रोमन लिपि करने का दुराग्रह बोडो साहित्य सभा के सामने किया था । लेकिन बोडो साहित्य सभा के तत्कालीन अध्यक्ष श्री बिनेश्वर ब्रह्म के नेतृत्व में इस लिपि परिवर्तन की बात को अस्वीकार करते हुए बोडो भाषा को देवनागरी लिपि का ही समर्थन किया एवं रोमन लिपि को अस्वीकार किया । लिपि बदल करना ऊपर से दिखने में साधारण बात लगेगी । लेकिन यह रोमन लिपि तो कोई भारतीय लिपि नहीं है भारतीय भाषाओं के लिखने में असमर्थ है । कई बार यह मांग करने वालों के पीछे अलगाववादी तत्वों का भी हाथ रहा है । लेकिन बोडो साहित्य सभा ने देवनागरी भाषा को बरकरार रखते हुए यह भी संदेश दिया कि हम भारत के ही है और भारत के रहेंगे ।अलगाववादी तत्वों को यह निर्णय असहनीय था इसलिए उन्होंने हिंसा का सहारा लिया । 19 अगस्त 2000 की रात को चार आतंकी श्री बिनेश्वर ब्रह्म जी के घर में घुस गए और 19 गोलियां उनके शरीर में उतार दी । 
सभी लोग स्तब्ध रह गए । सारे समाज ने आतंकियों के एक स्वर में धिक्कारा । 
अपनी भाषा की रक्षा के लिए श्री. बिनेश्वर ब्रह्म जी ने हौतात्म्य स्वीकारा । उनके इस बलिदान के कारण आज बोडो भाषा फल फूल रही है । धन्य है वह समाज । धन्य है वह लोग जो अपनी भाषा एवं संस्कृति की रक्षा हेतु जीते हैं, बलिदान करते हैं । ऐसे समाज और लोगों को शत-शत नमन

 🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते..... 
छोट्या छोट्या कार्यक्रमातून सामूहिकतेचा भाव कसा जपता येतो त्याचे. त्यातून मोठे कार्य किती सहज आणि सुलभ होऊ शकते त्याचे...
प्रकरण ... 20, 22, 31, 32, 
नाग भूमीतील एका कार्यक्रमात 4000 लोक उपस्थित राहणार होते त्यांची बसण्याची व्यवस्था खुर्चीवर करण्याचे ठरले यासाठी मोठा खर्च अपेक्षित होता परंतु आयोजकांनी त्याच गावातील 200 कुटुंबांना प्रत्येकी 20 खुर्च्या विकत घ्यायला आवाहन केले लोकांनी समाजासाठी तेवढी तसदी घेतली व सहजतेने 4000 खुर्च्या उपस्थित झाल्या.

🏵️ हे पुस्तक #अनुभूति देऊन जातं ते... 
कार्यकर्त्यांनी केलेल्या विविध प्रयत्नांचे. 
कार्य रुजवण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांचे, 
किती ही मान मरातब मिळाला तरी ही, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील गीतात वर्णन केल्या प्रमाणे वनवासी कल्याण आश्रमाचा "कार्यकर्ता" हेच आमचं श्रेष्ठत्व आहे हे कृतीने सिद्ध करणाऱ्या साधकांचे...
प्रकरण 1, 14, 16, 21, 34, 35, 36
प्रकरण 35, 36  हे पद्मश्री प्राप्त वनवासी कल्याण आश्रमाच्या दोन वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विशेष प्रकाश टाकणारे आहे. 
श्री चैत्राम पवारांना आपण अनेकजण ओळखतात परंतु उत्तर बंग मध्ये कल्याण आश्रमाच्या श्रध्दा जागरण कामातून आपल्या समाजाचे धर्म रक्षण करणाऱ्या गुरुमाता कमली सोरेन यांच्या बाबतीत लेखक काय लिहितात ते पहा, 
पद्मश्री पुरस्कार प्राप्त गुरु माता का सम्मान कार्यकर्ता सम्मेलन में किया गया तब उन्हें मनोगत के लिए आमंत्रित किया गया ।
उन्होंने धीरे आवाज में संकोच करते हुए बोलना प्रारंभ किया,"एक दिन मुझे गांव वालों ने सूचना दी कि जिलाधिकारी महोदय मिलने आ रहे हैं । मैंने सोचा कि मैंने कुछ गलती तो नहीं की फिर भी इतना बड़ा अफसर क्यों मिलने आ रहा है । कुछ समय के बाद दो-तीन गाड़ियां मेरी कुटिया के बाहर आई । जिलाधिकारी महोदय ने पूछा "आप ही गुरु माता है ना?" मैंने कहा "हां" फिर जिलाधिकारी ने बताया कि "प्रधानमंत्री कार्यालय से फोन आया है कि, गुरु माता जो समाज सेवा का काम कर रही है उस हेतु उन्हें पद्म पुरस्कार देना चाहते हैं" । मैंने पूछा कि, "यह पद्म पुरस्कार क्या होता है ? और मुझे क्यों दे रहे हैं? अधिकारी ने बताया, "यह देश का सर्वोच्च सम्मान है जो समाज के लिए काम करते उन्हें भारत सरकार द्वारा दिया जाता है"  तो मैंने कहा कि, "मैं इतना बड़ा भी कार्य नहीं कर रही हूं और पुरस्कार के लिए काम नहीं कर रही हूं । अधिकारी ने तुरंत बताया कि, "इसीलिए आपको यह सम्मान देना चाहते हैं । 
मैंने कहीं बार उनको समझाने का प्रयास किया । मना किया । लेकिन वह अड़े रहे और मेरी स्वीकृति लेकर ही निकले । फिर मैं दिल्ली गई और सम्मान लेकर आई हूं । मैं तो कल्याण आश्रम के कार्य से जुड़ी है । 
उन्होंने प्राप्त सम्मान पत्र सबके सामने रखा और बताया, कल्याण आश्रम को यह सम्मान समर्पित है । सबको विनम्र भाव से नमस्कार कर गुरु माता ने आसन ग्रहण किया । 
इतना बड़ा पुरस्कार प्राप्त करने के बाद भी इतनी सहजता, सरलता, निर्मोही, निरपेक्ष वृत्ति किसी पहुंचे हुए साधक की ही हो सकती है ।
सभागार में बैठे सभी लोग स्तब्ध, शांत एवं उस करुणा मय गुरु माता को निहारत रहे ।

# प्रकरण 2 मधील आत्मविश्वासाने 14 किलोमीटर ची मॅरेथॉन जिंकणारी; आजारी म्हणून स्पर्धे पूर्वी बाद केली गेलेली प्रियांका असो अथवा प्रकरण 6 मधील सीमावर्ती मधुलोंग गावातील आजारी असलेली आजी, हव्या तेवढ्याच गोळ्या घेणारी आणि त्या बदल्यात घरातील 3 अंड्याच्या रूपात परतफेड करणारी, 
प्रकरण 8 मधील युवक जे कल्याण आश्रमाच्या परीक्षा केंद्रात शिकले. जेव्हा तिघांना प्रत्येकी पहिले मानधन रुपये 8 हजार मिळाले त्यातून प्रशिक्षण केंद्राला नवा संगणक घेवून देणारे छत्तीसगड चे युवक आपणाला कृतज्ञतेचा अनोखा संस्कार देऊन जातात.
प्रकरण 11 मणिपूर मधील जोनाकी दीदी गावातील एका भगिनीला मुस्लिम चालक घेऊन गेल्यानंतर त्याच मुस्लिम वस्तीतील चार तरुणांना सर्वांच्या समोर पकडून आपल्या घरी कोंडून ठेवून त्या बदल्यात मुलगी परत मिळवणारी सबला नारी.. 
मुंबई मध्ये 2016 मध्ये झालेल्या खेलकूद स्पर्धेच्या वेळी देशभरातून सहभागी झालेल्या 325 पेक्षा अधिक खेळाडूंना मुंबईतील विविध जाती पंथातील 200 हून अधिक परिवाराने स्वतःच्या घरातील भोजन देऊन सह भोजनाचा अनुभव घेतला. 
सामाजिक समरसतेचा तो अनोखा प्रयोग प्रकरण 13 मध्ये आपण वाचू शकता. 
जशपुर स्वयंपाकी झांगुल मामा.. आपल्या पुंजीतून कल्याण आश्रमाच्या जशपुर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी खोली बांधणाऱ्या मामाना मुंबईतील नाना पालकर रुग्ण सेवेचेच प्रतीक का मानू नये?. नीता बर्वे पुण्यातील धडाडीची कार्यकर्ती 1999 मध्ये नागालँड मध्ये कार्य करण्यासाठी गेली तेव्हा प्रवासाला साधन म्हणून अनेक वेळेला ट्रक टेम्पोच्या छताचा उपयोग बिनधास्त पणे करायची. (नीता ताई आज विदर्भ कल्याण आश्रमाची पदाधिकारी आहे).... 
...अशा अनेक अनुभूतिचे आगार असलेले हे पुस्तक आत्मविश्वास जागवण्याचे, समरसतेचे, मातृ हस्ते भोजना द्वारे पारिवारिक संबंध निर्माण करण्याचे, सभ्यतेचे, गरिबीतील श्रीमंतीचे, स्वाभिमानाचे, बरोबरीने समाजातून लुप्त होत चाललेल्या अनेक सदगुणांचे जे आज धूमकेतू प्रमाणे अवचित कुठे तरी प्रकटात त्याचे पारदर्शी, शाश्वत रूप आहे.

मायबाप वाचकांना गाऱ्हाणे इतकंच आहे की त्यांनी हे #अनुभूति पुस्तक विकत घेऊन आवर्जून वाचावे. संग्रही ठेवावे. इतरांना वाचण्यास प्रवृत्त करावे. जमल्यास वाढदिवस अन्य मंगलमय कार्यक्रमात अनेकांना भेट द्यावे. संस्थानीही आपल्या उपक्रमात सहभागी करावे.

कारण हे सारे अनुभव आणि अनुभूति ज्यांनी घेतली ते अतुल जोग ह्याच जनजाती समाजासाठी समर्पित जीवन जगत आहेत. त्यांच्या परिचयामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर चार वर्षे नोकरी केली ती सोडून प्रचारक म्हणून राष्ट्रकार्यात उडी घेतली. 
प्रथम पाठ म्हणजेच प्रकरण एक मध्ये त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ जाताना समाजाच्या साठी कार्य करण्याची संधी मिळाल्या बद्दल सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. जेव्हा संपूर्ण पूर्वांचल घुसखोरी व आतंकी गतिविधिने धगधगत होता त्यावेळी पूर्वांचलामध्ये त्यातही नागालँड मध्ये 1994 साली तेथे जाण्याचा संघटनेचा निर्णय शिरसावंद्य मानून गेले. 
पहिल्याच भेटीमध्ये स्वामी असिमानंद यांनी जो कानमंत्र दिला 'आपण जनजाती क्षेत्रात शिकवायला नाही तर शिकायला जात आहोत आणि याच भावनेने काम केले तरच आपण त्या समाजाशी मैत्री करू शकतो आणि थोडेफार परिवर्तन करू शकतो" पहिल्या दिवशी मिळालेला हा कान मंत्र अगदी आजही अनुसरून त्याप्रमाणे कार्य करणारे व इतरांना ही तोच सल्ला देणारे अतुल जोग हे 2018 पासून वर्तमान अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे मा. अखिल भारतीय संघटन मंत्री आहेत. 
प्रकरण सात मध्ये तीर किसने मारा? या कथे अंतर्गत गुरुनानक जी, शंकर देव यांचा तिबेट ला जातेवेळी पाचशे वर्षांपूर्वी पूर्वांचलात झालेल्या प्रवासाचे वर्णन आलेले आहे.  
भारत भ्रमणाचा उल्लेख आलेला आहे. 
ज्यांना ज्यांना देश घडवायचा आहे अथवा अमुलाग्र परिवर्तन करायचं असल्यास सर्वप्रथम त्यांनी भारताचे अखंड दर्शन करणे महत्त्वाचे आणि ही परंपरा सर्व संतांनी तर पाळलीच बरोबरीने स्वामी विवेकानंदांनी ही परिव्राजक अवस्थेत संपूर्ण भारताचे दर्शन घेतले. महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये 1915 मध्ये आले तेव्हा त्यांचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना सर्वप्रथम भारत फिरण्यास सांगितले. हाच वसा सोबत घेऊन अतुलजी देशभर जनजाती समाजासाठी भ्रमण करत आहेत. आणि या भ्रमणामुळे त्यांच्या वाणीला आणि कृतिला भगवंताचे अधिष्ठान प्राप्त झालेले होतेच ते सिद्ध हस्ते आता लेखणीत ही उतरलेले आहे. अतुलजींनी अनेक भाषणांमध्ये, बैठकींमध्ये यातील अनेक उदाहरणे अत्यंत तन्मयतेने सांगितलेली आहेत परंतु सरळ, साध्या, सोप्या भाषेत, कमी शब्दात त्यांनी ही सर्व व्यक्तिचित्रणे लिखाणाच्या मार्फत उभी केलेली आहेत एका अर्थाने जिवंत केलेली आहेत. त्यात त्यांचा लेखनाचा पैलू,   आपला मुद्दा पटवून देताना संस्कृत समर्पक श्लोक व गीतांच्या ओळी यातून त्यांचा विविध विषयातील व्यासंग ही प्रभावीपणे समोर आलेला आहे हे ही या #अनुभूति चे यश म्हणावं लागेल... 
अपनी बात मध्ये शेवटी त्यांनी उल्लेख केला आहे जे त्यांच्या पारदर्शी व्यक्तिमत्वाचे धोतक आहे. 
' इसमें जो भी अच्छा है वह समाज का है यदि कुछ कमी है वो मेरा है ..


पुस्तक सर्व दृष्टीने उत्तम झालेलेच आहे परंतु अतुलजींकडे पूर्वांचलातील फारच सुंदर छायाचित्रही आहेत. त्यातील ते जाणकार आहेत या पुस्तकांमधील फोटो थोडे अधिक चांगले छापता आले असते किंवा रंगीत करता आले असते तर बरे झाले असते अर्थात हे माझे मत आहे.

या #अनुभूति ला तितक्याच अनुभव संपन्न अशा वरिष्ठ कार्यकर्त्याची प्रस्तावना लाभलेली आहे जे स्वतः जनजाती समाजातील आहेत. आपल्या कर्तृत्वाने अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी विराजमान झालेले श्री. सत्तेंद्र सिंह यांनी आपल्या प्रस्तावने मध्ये जनजाती समाजाची जी परंपरागत वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. जनजाती समाज ज्या आदर्श मूल्यांसाठी ओळखला जातो त्या सर्व पैलूंना अतुलजींनी आपल्या या पुस्तकात समाविष्ट करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि हा यशस्वी प्रयत्न ते करू शकले कारण जनजाती समाजाला त्यांनी सर्वार्थाने आपलेसे केलेले आहे. त्यांच्या उन्नती साठी झिजत आहेत त्यामुळे जनजाती समाज आणि लेखक हे खऱ्याअर्थाने अद्वैत रूपच आहे असे सत्येंद्र सिंह ह्यांना वाटते म्हणून आपल्या प्रस्तावनेत ते शेवटी म्हणतात.
श्री. अतुल जोग जी कार्यकर्ताओं द्वारा दिए गए दिव्य मंत्र और उनके जीवन के अनुभव एवं अनुभूति को आत्मसात करने के परिणाम स्वरूप वनवासी कल्याण आश्रम के राष्ट्रीय संगठन मंत्री है. वह साधारण कार्यकर्ता से असाधारण बनकर अपने दायित्व का सफलतापूर्वक निर्वहन कर रहे हैं.  यह कृती सभी कार्यकर्ताओं के लिए सार्थक सिद्ध होगी ऐसा पूर्ण विश्वास है. 
इस 'अतुलनीय' आदर्श जीवन शैली की #अनुभूति के लिए श्री अतुल जोग को बहुत-बहुत बधाई अभिनंदन एवं हार्दिक शुभकामनाएं 
मा. सत्येंद्र सिंहजिंचे मी पण आभार मानतो त्यांनी माझ्या लेखाला आयते शीर्षक मिळवून दिले 'अतुल'नीय - "#अनुभूति" 

एकाच प्रवास बैठकीत संपलेले हे पुस्तक संपता संपताच यावर काहीतरी नक्की लिहिले पाहिजे असा संकल्प करूनच बंद केले. 

पुस्तक परीक्षण सकाळी गाडीतच लिहायला घेतले ह्याचे आणखी एक कारण म्हणजे या सर्व पुस्तकाला लाभलेली पार्श्वभूमी ही पूर्वांचलाची आहे आणि माझा उत्तर पूर्वांचलाशी बादरायण प्रकारचा संबंध आहे.
प्रत्यक्ष माझं पूर्वांचलात जाणे जरी कमी असले तरी 1991 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या SEIL ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून मी भावनिक दृष्ट्या जोडलेलो आहे. महाराष्ट्र व भारतात वेळोवेळी आलेल्या व तेथे गेलेल्या SEIL tour च्या आयोजनामध्ये एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका  निश्चितच राहिलेली आहे. केंद्रीय कार्यालय मंत्री जबाबदारी येण्यापूर्वी वर्तमान सर कार्यवाह माननीय दत्ताजींच्या पूर्वांचल व तेथील कार्यात विशेष आग्रहा मुळे मी SEIL जो उत्तर पूर्वांचलासाठी चालवला जाणारा न्यास आहे व विद्यार्थी निधी ज्याचे अध्यक्ष दिवंगत मदन दास जी व प्रा. बाळासाहेब आपटे होते अशा ट्रस्ट चे काम ही केलेले आहे. 
माय होम इज इंडिया निमित्ताने मुंबई व तेथील निर्माण झालेले ऋणानुबंध. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, सेमिनार, आर्थिक उभारणी साठी दरवर्षी निघणारी स्मरणिका. त्या त्या स्मरणिकेचे आकर्षक शीर्षक या सर्व घडामोडीचा पाया हा इमोशनल इंटिग्रेशन आहे जे SEIL चे ब्रीद वाक्य आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय कार्यालय मंत्री असताना या भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत त्यांची व्यवस्थात्मक जबाबदारी अनेकांच्या बरोबरीने माझ्याकडे ही होती. त्यामुळे आमच्या भागातून  पूर्वांचलात गेलेला नील हेळेकर कार्यकर्त्या पेक्षा आमच्या शाळेतील हेळेकर टीचरांचा मुलगा म्हणून परिचित होता त्या सह अगदी सुरवाती पासून तेथे कार्यरत असलेले मा. व्ही सतीश जी, राघवन जी, मित्र शाम मोगा, संजय कुलकर्णी, राजू नन्नावरे, अविनाश कोळी, विनोद पुसदकर, आशिष भावे, योगेश पाताडे, सुरेंद्र नाईक श्रीहरी, नीरव गेलानी, प्रितेश देसाई , अदिती  कुलकर्णी ते 2015 पर्यंत पूर्वांचालात काम करण्यासाठी पाठवलेले नवीन दमाचे कार्यकर्ते. 
पूर्वांचलाचा ध्यास घेऊन स्थानीय ठिकाणी आपल्या प्रतिभेनुसार कार्य करणारे शशिकांत, अतुल कुलकर्णी बरोबरीने My home is इंडिया मार्फत जोडलेले सुनील देवधर व त्यांचे पूर्वांचल समजून देणारे वक्तृत्व कार्यक्रम, IMDT act, घुसखोरी त्यावरील प्रस्ताव असतील अथवा कोकराजार हिंसेच्या वेळेला केलेली मदत. 
किमान चार-पाच वेळेला पूर्वांचला संदर्भात भाषण करताना केलेला अभ्यास, पूर्वांचलात तात्पुरते कार्य करण्यासाठी जाणाऱ्यांना मदत करणे बरोबरीने विविध कार्यालयात वास्तव्यात असलेले पूर्वांचलातील कार्यकर्ते. त्रिपुरातून मुंबईत भूमिगत असलेल्या एका कार्यकर्त्याचा मी तीन वर्षे गार्डियन होतो. 
अशा सर्व माध्यमातून तेथील झालेली मैत्री ज्यात आघाडीचा दिग्दर्शक आणि सध्या सरकारी अधिकारी असलेला के डी(कोलेन डॉल्गोपू), खासदार दिलीप सैकिया, किसान संघाचा प्रमुख कृष्णा, नेपाळ मध्ये कार्य करणारा दीपक अधिकारी त्याची बहीण पुष्पा, अशी अनेक नावे सांगता येतील.. पुस्तक वाचता वाचता या सर्व स्मृती ही जागृत झाल्या. तेथील सहज उच्चारता न येणारी नावे पण आपलीच आहेत ह्याची असलेली जाणीव, वेगवेगळ्या जमाती त्यांचे परस्पर संबंध, दिल्ली कार्यालयातील नीतू,  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पूर्वांचल क्षेत्रातील जनजाती वीरांचे योगदान यासंदर्भात पुस्तक लिहिणारे श्री. जगदंब मल यांच्याशी झालेला संवाद आणि म्हणून केवळ आपल्या समाधानासाठी त्या रम्य स्मृतींना उजाळा देऊन गेलेल्या ह्या पुस्तकाचे परीक्षण केलेच पाहिजे आणि वेळ न घालवता मी ते करू शकलो याचा आनंद अधिक आहे कारण जो आत्मीयतेचा गाभा या #अनुभूति चा आहे तोच सामाजिक संवेदनेने कार्य करणाऱ्या आपल्या सर्वांचा आहे. 

खरंतर लिखित स्वरूपात पुस्तकाचे परीक्षण करण्याचा हा माझा पहिलाच व्यापक प्रयत्न आहे. याच्या अगोदर शेफालीताईच घार हिंडते आकाशी या पुस्तकाचं मी एका वेगळ्या संदर्भात थोडक्यात परीक्षण केलेलं होतं.
मित्र सुहास वैद्यने लिहिलेल्या वैदेही पुस्तकाचे निरूपण करावे असे डोक्यात होते पण ते काम अजून अर्धेअधुरे आहे. 
अनेक प्रशिक्षणामध्ये पुस्तक परीक्षण कसं करावे असे सत्र ही मी घेतलेले आहे. परमपूजनीय गुरुजी लिखित 'राष्ट्र' या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण बैठकीमध्ये पण केल्याचे आठवते ह्या भांडवलावर आजही ज्यांच्या बरोबर मैत्री कायम आहे, निसर्गाचं अनुपम लेण ल्यालेला हा स्वर्गमय प्रदेश, या पुस्तकातील वर्णन केलेल्या साऱ्यां सोबत असलेले आपले अदृश्य नाते. कधी काळी ह्या साऱ्या प्रदेशातून कागदावर का होईना फिरलेलो आहे त्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने मिळते आहे ह्याच भावार्थाने या पुस्तकाचे मला जेवढे मोल समजले त्याप्रमाणे समीक्षा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 

अतुलजींच्या व माझ्या पहिल्या प्रयोगाला आपण सकारात्मक दाद देऊन हे पुस्तक आवर्जून विकत घेऊन वाचाल या अपेक्षेसह... 

या पुस्तकाचे महत्व अशा पद्धतीने सांगता येईल ज्याप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये परिषदेचे शिल्पकार प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्यावर आधारित "माणूस नावाचे काम" हे पुस्तक आहे जे सर्व दूर, सर्वांकडे आदर्श कार्यकर्ता व्यवहाराची गीता म्हणून संग्रही आहे त्याचप्रमाणे अजून ही अपरिचित उत्तर पूर्वांचल सर्वांच्या समोर येण्यासाठी, निराशे मध्ये आशा उत्पन्न करण्यासाठी, कामाची गती वाढविण्यासाठी,  कधी मध्ये कामाचा कंटाळा आला तर ' चलते चलो' चा नारा देण्यासाठी, सामाजिक कामाचा  हुरूप वाढविण्यासाठी, सामूहिक समाज परिवारासाठी, ध्येयावर श्रद्धा व निष्ठा अविरत वाढविण्यासाठी हे टॉनिक रुपी #अनुभूति पुस्तक कोणत्या ही  पानापासून वाचून सतत प्रेरणा मिळण्यासाठी शुभेच्छा !  

ज्याप्रमाणे काही सिनेमांना टॅक्स फ्री केले जात त्याप्रमाणे अशा चांगल्या पुस्तकांनाही अधिक सवलतीच्या दरामध्ये मिळण्याची व्यवस्था हवी जेणेकरून हे सकारात्मकतेचे व गुणविशेषाचे परागकण  अनेक लोकांपर्यंत पोहोचतील. 
हिंदी प्रमाणेच अनेक भाषांमध्ये याचे भाषांतर झाले तर फारच उत्तम होईल. 
पुढे मागे मी मराठीत नक्की याचे भाषांतर करू शकतो.

पाथेय.... जाता जाता....
भगिनी निवेदिता यांनी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन भारतीय व विदेशी मानसिकता कशा प्रकारे आहे ते व्यक्तिगत व सामूहिक व्यवहारातून स्पष्ट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, विदेशातील माणूस सार्वजनिक साधन सुचिता, नियम याचं काटेकोरपणे पालन करेल त्याच्या दृष्टीने भारतीय व्यक्ती व समाज हा याबाबतीत मागासलेला आहे परंतु प्रत्येक सनातन भारतीय हा ईश्वर एक आहे. पुनर्जन्म हा कर्मावर अवलंबून आहे. आत्मा अमर आहे आणि चराचरामध्ये तो व्याप्त आहे याला अनुसरूनच आपलं जीवन जगेल जे पाश्चिमात्य एखाद्यालाही समजणे कठीण आहे.
हेच अंतिम सत्य या संपूर्ण पुस्तकाचे सार आहे. हे मांडताना लेखकाला हृदय द्रावक अशा अनुभवाला सामोरे जावे लागले.
ज्या घरी गेले होते त्या घरातील मुलगा दोन दिवसापूर्वी अपघातात गेला होता. ह्याची कोणती ही पूर्वकल्पना आलेल्या लोकांना नाही केवळ प्रवासा निमित्त ते आपल्या घरी आलेले आहेत हे जाणून घरातील सर्वांनी आपले दुःख बाजूला ठेवून अतिथी देवो भव या नात्याने केलेले स्वागत व त्यानंतर समोर आलेली करुणामयी कहाणी. जी शरीर नश्वर है ,आत्मा अमर है ह्या कथेत लेखकाने मांडलेली आहे. जो माझ्या दृष्टीने शेवट नसून #अनुभूतिचा प्रारंभ आहे.
 
उसपर लेसिथोजी बोले, "अनहोनी हो गई, जानेवाला चला गया, फिर हम क्यों रुके ? अपना काम करते जाओ । हम उस मां की तरफ भी देख रहे थे । वह भी शांतभाव से अपने कार्य कर रही थी । मन में विचार आया, सरकारी नौकरी करने वाले जवान लड़के का असमय निधन होना माता-पिता के लिए कितना  कष्टदायक होता है । लेकिन फिर भी जीवन के सत्य को जानते और मानते हुए व्यवहार करनेवाले इन लोगों से बहुत कुछ सीखना बाकी है, ऐसा लगा ।।।।

अशी ही
#अनुभूति घ्या #अनुभूति द्या......

Tuesday, 5 December 2023

अभाविप एक जमात

3rd angle
हां बराबर है आप विद्यार्थी परिषद से हैं ना !
हे वाक्य कानावर जेव्हा पडते याचा अर्थ एक तर तुम्ही सुधारणार नाही किंवा एका माळेचे मणी जे वरून खालून सारखेच 
अभाविप 75 वर्षाच्या निमित्ताने दिल्लीत दिनांक 7 8 9 10 रोजी डिसेंबर रोजी महा अधिवेशन होते त्यानिमित्ताने विद्यार्थी परिषदेचे पंचवीस वर्षे काम केलेले माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काम करताना त्रयस्थपणे जे वाटतं  ते मांडण्याचा क्रमशा प्रयत्न करत आहे 
🌈🌈🌈🌈 भाग 1,🌈🌈🌈🌈

अभाविप एक जमात 
ABVP is a tribe 

शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल परंतु गेल्या 75 वर्षात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी/ऱ्या अग्रणी अशा विद्यार्थी संघटनेबरोबरच, कार्यकर्ता आधारित भारतातील प्रभावशाली, सामाजिक जन संघटन या अभाविपच्या सर्वमान्य ओळखीसोबतच अभाविपची आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP 
ही एक जमात (tribe) आहे असं अनेकांना वाटते. 

भारतामध्ये जो गिरी कंदामध्ये, दूर जंगलामध्ये वास्तव्य करतो त्या वनवासी, आदिवासी, जनजाती  समजाची ओळख व व्याख्या करताना पाच गोष्टी निश्चित केल्या आहेत 
त्या म्हणजे  
भौगोलिक अंतर 
2) विशिष्ट संस्कृती, बोलीभाषा 
3) परंपरा बरोबरीने रूढी गत न्याय व्यवस्था
4) सामाजिक व आर्थिक मागासलेपण आणि 
5) संकुचित स्वभाव 

ह्या वर्गीकरणाच्या आधाराने जो समुदाय ह्याचे काटेकोर पालन करतो त्याला tribes म्हणून गौरविले गेले आहे. समजात विशेष दर्जा दिला गेलेला आहे.

सामाजिक संघटन व संघ विचारधारेच्या दृष्टीने  विचार केला तर वरील पाचही बिंदू अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला म्हणजेच  ABVP ला लागू होतात त्यामुळे संघाच्या विचारधारेतील जवळजवळ शंभर एक संघटनांमध्ये अभाविप वेगळी जमात tribe म्हणून उठून दिसते वर्तमान परिप्रेक्षात जवळजवळ सर्वांनी हे मान्य ही केलेले आहे.

भौगोलिक दृष्ट्या अंतर 

ज्याप्रमाणे जनजाती समाज हा दूर जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करतो. प्रगत समाजापासून भौगोलिक दृष्ट्या असमतोल अशा प्रदेशांमध्ये अथवा विकासापासून दूर अशा निश्चित केलेल्या शेड्युल एरियामध्ये तो राहतो त्याचप्रमाणे
अभाविपने सुरुवातीपासूनच म्हणजे 1948 च्या अंबाला अधिवेशनापासून ते 9 जुलै 1949 ला विधिवत पंजीकरण करताना आपले कार्यक्षेत्र हे शिक्षण क्षेत्र निवडले त्यात ही शाळेला प्राधान्य न   देता महाविद्यालय, विश्वविद्यालय निश्चित केले व आपल्या नावात विद्यार्थी ह्या केंद्रबिंदूचा समाविष्ट अखिल भारतीय स्वरूपात करून घेतला. या पार्श्वभूमीवर अन्य संघटनांचे कार्य क्षेत्र हे संपूर्ण समाज असते.

75 वर्षांच्या वाटचाली मध्ये आजही भौगोलिक दृष्ट्या विद्यार्थी परिषदेचे मुख्य कार्यक्षेत्र हे विश्वविद्यालय, महाविद्यालयच निश्चित आहे त्यावर आधारित शाखा, संपर्क केंद्र, विस्तार केंद्र व महाविद्यालय शाखा याची संघटनात्मक संरचना निर्माण झालेली आहे. जी आज हजारोंच्या संख्येने सर्व दूर पाहायला मिळतात.
विद्यार्थी हा फ्लोटिंग पोपुलेशन चा भाग असल्यामुळे दरवर्षी सदस्यता करणे.  दरवर्षी केल्या जाणाऱ्या सदस्यतेने ही  गेल्या काही वर्षात 50 लाखापर्यंत गवसनी घातलेली पाहायला मिळते.

विशिष्ट संस्कृती व बोलीभाषा

भारतामध्ये ज्यांना जनजाती सुचित समाविष्ट केलेले आहे त्यांची स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, परंपरा आणि बोलीभाषा आहे यामध्ये निसर्गपूजन अथवा सण, उत्सव, कार्यक्रम, पूजा अर्चना व जीवन ज्ञापन करताना त्यांच्या परंपरागत आखून दिलेल्या पद्धतीनेच केले जाते.
अभाविपने ही सुरुवातीपासूनच आपली सैद्धांतिक भूमिका, विचार व कार्यपद्धती, कार्यशैली राबविताना प्रत्यक्ष कार्यकर्ता व्यवहार त्यातून व्यक्ती निर्माणावर अधिक भर दिला.
विविध कार्यक्रम, प्रकल्प, अभियान, आंदोलन विद्यार्थ्याला प्रथम संपर्कात आणणे. त्यानंतर छोट्या मोठ्या जबाबदारी देत कामात सक्रिय करणे व त्यातून पुढे एक सामाजिक नेतृत्व प्रस्थापित करून आदर्श नागरिक घडावणे हे मूळ सूत्र ! 
मागे वळून पाहताना ह्या द्वारे विविध क्षेत्रात नेतृत्व करणारी कर्तृत्वान पिढी निर्माण झालेली दिसून येते. 
हे सारे घडून आले ते विशिष्ट संस्कृती म्हणजेच आपल्या अनोख्या कार्यपद्धती आणि त्या बोली भाषेतील शब्द अंगवळणी पडल्यामुळे, 
नेमकी आपली कार्यपद्धती आणि बोलीभाषा पुन्हा आठवूया 
“राष्ट्र पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात”, सामूहिकता, अनामिकता, परस्पारिकता, प्रथम पुरुषी विचार, मते अनेक निर्णय एक, सब चलेंगे साथ चलेंगे, 
ज्ञान-शील-एकता, स्वतः प्रति कठोर इतरां प्रति मृदू, बैठक, पूर्व योजना-पूर्ण योजना,  पाठपुरावा, विषय मुरवणे, प्रवास, प्रवासी कार्यकर्ते, संपर्क-संवाद, लॉंग रोप, चल चहा घ्यायचा का? हे केवळ शब्द राहिले नाहीत तर ते लाखो कार्यकर्त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले. 

तत्व आणि व्यवहार एकरूप झाले. उक्ती आणि कृती यातील अंतर कमी झाले.
प्रत्येक tribes चा एक मुखीया, गावगुडा, पटेल, मुंडा असतो त्याच्यावर अनेकांची श्रद्धा भक्ती असते त्याच्या अनुषंगानेच नंतरचे नेतृत्व घडत असते त्याचप्रमाणे अभाविप जमातीचा मुखिया म्हणून प्रा यशवंतराव केळकरांना स्वीकारले गेले आणि त्यांच्यामार्फत

विकसित होत गेलेली कार्यपद्धती, बोलीभाषा, दाखले हे शाश्वतेचे रूप घेवून आज ही वर पासून खाल पर्यंत मंत्री, संघटन मंत्री, प्राध्यापक, प्रमुख कार्यकर्ता, वरिष्ठ कार्यकर्त्याच्या रूपात  खालपर्यंत झिरपत आहे.
                                .      ............2..........

Sunday, 29 March 2020

देश बचाकर और लड़ेंगे भी ...

देश बचाकर और लड़ेंगे भी ...

पूरे विश्व में आज इजरायल ही सभी दिशाओं से  मुस्लिम राष्ट्र से घिरा हुआ है और उनके अनेक सतत आक्रमणों  से परेशान भी रहता है । मगर राष्ट्रीय इच्छाशक्ती और जनता के अनुपम धैर्य, साहस से वह प्रत्येक हमले पर पलटवार भी करता है और हमेश ना केवल यशस्वी होते हुये आज सीना तान कर खड़ा है।

लगभग 2000 साल से विभिन्न देशों में रहे ज्यू/ज्यूश हमेशा , “कभी ना कभी तो हम अपनी भूमि पर एक राष्ट्र के नाते इकट्ठा होंगे “ यह मनीषा लेते हुए । हर साल ,एक दूसरे को याद दिलाते रहते थे।

1948 में, उनका यह सपना साकार हुआ और इजराइल देश का जन्म हुआ , कड़े  संघर्ष और लंबी प्रतीक्षा के बाद प्राप्त हुआ वतन और अपनी मिट्टी का मोल वह पूरी  तरह  जानते थे । इसीलिए  पहले दिन से ही देश सर्वतोपरी इस भूमिका का निर्वाहन सभी ने स्वीकार किया ।

इजरायल की स्थापना  करने में हर ज्यू नागरिकों के साथ साथ सबसे बड़ा योगदान 1948 में अरबो से निर्णायक संघर्ष करते हुये अपनी सैन्य शक्ति का नेतृत्व करने वाले सेनापती मोसे दायन का रहा ।

अतुलनीय शौर्य, भीम पराक्रम, सक्षम युद्ध नीती के कारण वे विजय के शिल्पकार बने , जब व्यक्ति  असामान्य गुणों  से  युक्त होता है तब उसके लिये नियमों में भी परिवर्तित किया जाता है । उपरोक्त गुण पहचान के    साथ-साथ मोसे दायन की एक और पहचान थी , उनकी एक आख पर हमेशा काली पट्टी बंधी होती थी , एक युद्ध के दरमियान उनको एक आँख  खोनी पड़ी  थी ।
एक दृष्टि से  सैन्य के सेनानी के रूप में दायित्व संभालने हेतु वह नियम के तहत असक्षम थे । फिर भी ऊनका काम इतिहास के पन्नो पर धुरंधर सेनानी की भाँति  अंकित हुआ  ।

सेनापती से वह राजनीति / शासन  में सक्रिय हुये और वहां भी लगभग 5 साल 1953 से लेकर 1958 तक डिफेंस मिनिस्ट्रर रहे।

ऐतिहासिक सुवेज संकट का भी उन्होंने हल निकाला था। बाद में सत्ता में राजनीतिक पार्टी बदल गई , और उनकी  पार्टी और उन्हें विपक्ष में बैठना पडा । फिर भी वे सतत वैज्ञानिक खेती,  सैनिक प्रशिक्षण और आम सैनिकों की सुविधाओं  के लिये काम करते रहे ।

फिर एक बार जब 1967 में युद्ध के बादल इजराइल पर मंडरा रहे थे , देश के रक्षा मंत्री देश की परिस्थिति को सुलझा नही पा रहे थे और सैन्य शक्ति का मनोबल दिन प्रतिदिन गिरते जा रहा था । लोगो को मोसे दायन की याद आने लगी की इस विपरीत परिस्थिती का सामना मोसे दायन ही कर सकते है ।
सैन्य और देश का मनोबल वे ही बढ़ा सकते हैं इजराइल  की सुरक्षा अगर अखंड रखनी है  तो इस युद्ध जीतना ही पड़ेगा  यह महसूस  करते हुये तत्कालीन रक्षा मंत्री ने  स्वयं अपना पद छोड़कर , तब  विपक्ष में बैठे “ ग्रेट मोसे दायन “ को  अपने पद पर नियुक्त किया ।

पक्ष , मेरी हैसियत , लोग क्या कहेंगे, मै क्यूँ त्याग  पत्र दूँ ,  अगर दे भी दूँ तो अपनी नजदीकी वाले को क्यूँ ना  विराजमान करूँ ,  जिससे  मेरा नियंत्रण बना रहे ऐसी कोई भी बात न सोचते हुये ,  राष्ट्र सर्वोपरि है  यह मानते हुये रक्षा  मंत्री ने एक अनुपम मिसाल रखी ।

अपने अनुभव कुशलता और जनता के विश्वास पर इस परिस्थिति से भी मोसो दायन  ने इजरायल को बचाया । युद्ध जीता और देश ने विश्वास से दिये अस्थायी रक्षा मंत्री के  पद का भार फिर से उन्हीं  रक्षा  मंत्री को सोंपते हुये एक आदर्श सैनिक तथा नागरिक का कर्तव्य निभाया ।

आज इजरायल पूरे विश्व में अपने ना केवल अपनी सामरिक ताकत पर सर्वश्रेष्ठ माना जा रहा है , मगर ये सभी नागरिकों में विचार होना की  “ पद की लालसा न रखना,  अपनी व्यक्तिगत  मर्यादा, कुशलता का आँकलन  करते हुये दायित्व स्वीकारना , समय आने पर नाकामी का सिलसिला आगे न बढाते हुये,  देश ही सर्वदा सर्वोपरि है “ यह भावना रखते हुए त्याग हेतु तत्पर रहना , तभी यह संभव होता है।

यह आज याद आने का कारण :

आज पूरे विश्व Covid19 से लड़  रहा है ।  भारत में जो चित्र दिख रहा है , उसमें माननीय श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का नेतृत्व जनता ने मान लिया है। उनके ऊपर 100  करोड़ से ज्यादा भारतवाशी का विश्वास भी है, दिन प्रति दिन श्रद्धा से उनके आदेश का पालन हो रहा है।

मगर हमारी लोकतंत्र प्रणाली के अनुसार कुछ राज्यों में विभिन्न विचारों की सरकार कार्यरत है जो इस गंभीर और अत्यंत कठिनतम संघर्ष तथा हर व्यक्ति  के द्वार पर   खडी मृत्यु के समय में भी अपनी कुंठित राजकीय सोच और घृणीत हरकतो से बाज नही आ रहे है, और अपनी नाकामयाबी असफलता का डंका पिटने के बाद भी , हज़ारों लोगों  को मृत्यु  के मुह में निर्लज्जता  से ढकेल दे  रहे है ।

अपनी क्षमता व कूबत के अनुसार वह इस चुनौती से लड़ तो रहे हैं मगर यह पर्याप्त नहीं है ,   कुछ राज्य के मुख्यमंत्री परिस्थिति का मज़ाक़ उड़ाने  में तुले है जिस  में दिल्ली के मुख्यमंत्री केजरीवाल ने कल आनंद नगर में जो तमाशा किया वह सरासर निंदनीय है ।

महाराष्ट्र के मुख्यमंत्री की स्तिथि ऐसी हो गई है जैसे “ जाये तो जाये कहा , करे तो करे क्या , कोई हमदम नही रहा कोई सहारा नही रहा “ ,  ऐसी हालत बनाकर मिडिया में दिखाई दे रहे है । महाराष्ट्र में हर रोज़ ये महामारी बढती ही  जा रही है।

छत्तीसगढ़ में आंतरिक सुरक्षा खतरे में है , जिसका लाभ उठा कर फिर हिंसक नक्सलवाद पनप रहा है । पश्चिम बंग में , ममता जी ने तो उपाय से ज्यादा , केंद्र के आदेश को स्वयं की उपस्थिती में हजारो लोगो के समक्ष ठुकराने की जुर्रत कर रही है ।

तमिलनाड, बिहार, झारखंड, आंध्र, तेलंगना, महाराष्ट्र में  जहाँ इस महामारी का फैलाव ज्यादा है , मस्जिदों में , विदेशी मौलवी के भेश में आये दरिंदो को बड़े साजिश के तहत ,  बड़ी ममता से खुलेआम गोदी में बिठाये है । वामपंथी बहुल केरल में क्या चल रहा है , “चीन ने क्या किया ,  जो कभी किसी को समझ  में नही आये “ उस  कदर की प्रतिक्रिया हो रही है ।

और इन सबका उल्लू काँग्रेस का बिगड़ा हुआ और नादान शहजादा पुरे गुलिस्ताँ  को तहस नहस करने में जुटा हुआ  है ।

यह सभी छोटे , झुठे, मक्कार राज्य के प्रमुख और उनका पक्ष , अपनी विफल अस्मिता के चलते अपने पद से अभी हटेंगे नही और अपनी मनमानी करते रहेंगे , क्यूँकि  इस्रायल और मोसे दायन और उनकी राष्ट्र भक्ति को  समझना ,  इनके बस की बात नही ।

अब देश का वर्तमान परिदृश्य ,  इस प्रकार है एक जगह जागरूक नागरिक  एवं बहुत सी  राज्य सरकारें ,  वर्तमान परिस्थिती में स्वयं प्रेरणा से और अनुशासित स्वयंसेवक के भाँति , मानवता पूर्ण व्यवहार से, सेवा भाव से स्वयं के साथ अपने राज्य, जनता, परिवार के साथ साथ , समाज और देश को बचाने में जी जान से कोशिश  कर रहे है , तो दूसरी तरफ़ कई  धार्मिक उन्माद तले, दोगले पक्षीय  अभिनिवेश के सहारे, व्यक्तिगत स्वतंत्रता की विनाशकारी  कल्पना के साथ , होश खोकर, नियम कानून अनुशासन  की धज्जिया उड़ाकर, निर्लज्ज भाव से स्वयं के साथ अपने परिवार, साथ साथ समाज, राज्य, देश और अखिल मानव जाती के खिलाफ नंगा नाच कर रहे है,इन्हें ना तो दंडित  होने का भय है ना तो अपमानित होने की लज्जा , ना सर्वनाशी मृत्यु का भय । मानो ये मानवीय  बम  बनकर मानवजाती का संहार करने वाले दानव हो गए हों ।

ऐसे मिश्रित  वातावरण में भारत की आंतरीक सुरक्षा खतरे में पड़ सकती, या इसके  के कारण  आपात्कालीन परिस्थिती का सामना करना पड सकता है । बाह्य सुरक्षा एवम सार्वभौमिकता पर भी खतरा बढ़  सकता है ।

हमारी सेना सजग है । मगर अंदरूनी  हालात अगर काबू में नही रहे तो सैन्यशक्ति  को तैनात करना पड़ेगा ,  और बाह्य शत्रु इसका  फायदा लेने में तैयार ही बैठा है और उनके वफादार कुत्ते जो भारत में बुद्धिजीवी बन गली गली घुम रहे है वह देश का वातावरण और दूषित करेंगे ।

इसीलिए  किसी भी राजकीय पक्ष लोकतंत्र प्रणाली से जीत कर , राज्य कर रहे हो , वह अगर हमारी जान बचाने में कर्तव्य में अक्षम हैं  , तो एक बार क्षम्य है मगर किसी भी हालत में उन्हे हज़ारों जनता के जीवन मृत्यु के साथ राजनीति और सौदा करने का कोई अधिकार नही है ।

राज्य सरकार की अनदेखी,  दुसरे राज्यो में फसे अपने नागरिक की चिंता न करना जब खतरेकी सूचना मिली तभी हमारे देश के मा. पंतप्रधान जी ने विभिन्न देशो से भारतीय  नागरिक सभी प्रकार जोखीम उठाते हुये  सुखरूप लाए, मगर राज्य सरकारे हात पे हात धरे बैठी रही और अभि सब बंद होने के बाद केंद्र सरकार को कोसते हुये जाग गयी ।  अब जनता का एक राज्य से दुसरे राज्य में अवागमन शांती पूर्ण तरिकेसे संभव नही है । इसलीये बहुत सी जनता कानून तोडने हेतु बेबस होती जा रही है  और प्रशासन से लथाडते हुये, पुलीस कर्मीयो का मार खाने मजबूर हो गयी है । देश के प्रति चाहते हुये भी नियम का पालन नही कर पा रही है ।

उन्होने संविधान के तहत शपथ लेकर राज्य चलाने की नीती रीती ना केवल स्वयं के बलबुते पर निर्धारीत करनी है बल्कि  विरोधी पक्ष के माध्यम से जनता को जवाबदेही के साथ सरकार  चलानी होती है ।

उपरोक्त राज्यो में सक्षम विरोधी दल मौजूद है , जिनको बरसो से राज्य, प्रशासन चलाने का अभ्यास भी है , मगर दुर्भाग्य की बात यह है की सरकार इस आपदा में ऊनका सहयोग लेना अछूत मान रही है ।

अनेक सामाजिक संस्था हैं , जो ऐसे आपदा के समय सरकार के साथ निर्भयता तथा निर्मोही भाव से कंधे से कंधा मिलाकर काम करने हेतु सरकारी आदेश की राह देखते हुये तैनात खड़ी है ।।

सरकार, विपक्ष, प्रशासन, सामाजिक संस्था एवम नागरिक मिलकर समन्वय, सौहार्द, भाईचारा से समरस होकर सुचारु रूप  से व्यापक योजना के तहत एक होकर लड़ हेतु तत्पर रहे , यह अनोखा चित्र इस कसोटी पूर्ण समय में  साकार करने जो भी असक्षम है , तो उनको राज गद्दी को स्वयं त्यागना चाहिये ।

अन्यथा एक आदर्श भारतीय नागरिक के नाते घर में बैठकर , सोसिएल मीडिया के माध्यम से इस सत्य परिस्थिती को उजागर करते हुये , संविधानिक रचना के तहत उस उस राज्यपाल महोदय को  निवेदन, प्रार्थना करे की हमारे राज्य की असक्षम अकर्मण्य  सरकार को बरखास्त करे ।
ऐसे राज्य सरकार के खिलाफ परिस्थिती , इस से पहले की परिस्थिति वश  के बाहर  जाए , Go Back  का नारा और अभियान चलाना होगा ।

जैसे इतिहास में जुल्मी राज सत्ता लोक क्रांती से समाप्त की जाती थी , वैस ही जानता को अगर सरकार चुनने का अधिकार है तो वैसेही अति विशिष्ट परिस्थिती में सरकार  बरखास्त करने का भी अधिकार मिलना चाहिए  ।

इससे भी वे अगर नही मानते है तो इस अभूतपूर्व  स्थिती को सुचारू और नियंत्रित करने में हमारे , शीर्ष केंद्रीय  नेतृत्व सक्षम है ऊनको निर्णय तथा अमल  की पुरी छूट हेतु तुरंत आपात्काल की घोषणा देश में लागू करने की विनती माननीय सर्वोच्च न्यायपालिका और सन्माननीय राष्ट्रपति महोदय  और पंतप्रधान को करनी चाहीये ।

व्यक्तिगत जीवन बचे या ना बचे
पर देश बचना चाहीये ।
देश बचा तो अखिल मानवता के शत्रुओं से संग  लड़कर , विश्वजननी वसुंधरा को जिताऐंगे ।

शरद चव्हाण
जागरूक भारतीय नागरिक

Tuesday, 10 April 2018

जाहीर निमंत्रण एका पुनर्निमित कलेचे


काही अनुभवी...

काही नवीन कलाकारांच्या संचात...


कुशल मार्गदर्शक नट व कसदार दिग्दर्शक प्रमोद पवार यांच्या तालमीत साकार झालेले...


कलेचे उपासक म्हणून परिचित गिरगावातील साहित्य संघ मंदिराचे

निर्मिती मूल्य लाभलेले....

आणि  

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिजात लेखणीतून सद्यस्थितीवर कोरलेले कालसुसंगत ऐतिहासिक संगीत महानाट्य 

संन्यस्त खड्ग 

म्हणजे 

दोन मनाचा... 

दोन व्यक्तित्वाचा.... 

दोन विचार धारेचा....

परस्पर संघर्ष नसून 

कालसापेक्ष 

चिरंतन भारतीय तत्त्वज्ञानाचा 

एकसंघ विचारांचा

आणि या मातीतील एकरूप हुंकाराचा एक कलाविष्कार.....


शुभारंभ प्रयोग 

दिनांक 12 एप्रिल 2018 

सायंकाळी 6.30वाजता

साहित्य संघ मंदिर, गिरगाव  


कलाकृतीला प्रोत्साहित करण्यासाठी जुन्या बरोबरीनेच वर्तमान वस्तुस्थितीशी ही बावनकशी ठरलेल्या विचारांचे सोने लुटण्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे...



मी शरद चव्हाण 
आपणास विशेष निमंत्रित करतो आहे कारण या नाटकात प्रमुख भूमिकेत माझा मोठा भाऊ भरत चव्हाण काम करत आहे 
ज्यानी प्र ल मयेकर लिखित तक्षक याग नाटकात ही अविनाश नारकर, शरद पोंक्षे यांच्या सोबत भूमिका केली होती .
                     
 दुसरे कारण म्हणजे गायक नटाच्या प्रमुख भूमिकेत  संगीत रत्न मित्र अमोल बावडेकर जो माझा जिवलग मित्र होता त्या कै.शैलेश बावडेकर चा लहान भाऊ आहे.  

 आणि तिसरे प्रयोजन म्हणजे मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि आनंद आणि अभिमान आहे या नाटकाचे दिग्दर्शक ही एक स्वयंसेवकच जे संघ विचारधारेतील संस्था संस्कार भारती padadhikari v ज्येष्ठ रंगकर्मी shri प्रमोद पवार करत आहेत .


 

Sunday, 1 April 2018

3rd eYe

कशा साठी बाळासाठी ।

स्कूल में  हिरकणी नामक एक जुझारू वीर माता की कहानि पढी थी ।

छत्रपती शिवाजी महाराज के समय की इस कहानी में किले के दरवाजे शाम के समय नियम तहत बंद होने के बाद सबेरे दूध विक्री हेतु आयी हुई यह हिरकणी नामक महिला किले में फस जाती है ।

घर में पिछे छोड आये अपने शिशु  के पास लौटना अपनी मजबुरी एवं अत्यंत आवश्यकता है इस ममता भरी पुकार के बाद भी नियम से बंध्ये पहरेदार उसे बाहर जाने की अनुमती नही दे पाते है ।

कल सुबह तक द्वार न खोलने की असमर्थता प्रकट करते हुये वे अपने पहरेदारी में जुट जाते है।

अब एक माँ ने भी मन ही मन ठान लिया आज की रात बच्चा सोयेगा तो उसकी गोद में ही वो भी लोरी सुनते सुनते ।

अपने लाडले बच्चे को मिलने हेतु बेचेन माँ की कोमल ममता अब दृढ संकल्प में बदल जाती है ।

बच्चे को मिलने की लगन ने डर को जीत लिया फिर घने अंधेरे में ऊस रात ने पलभर में दिन दहाडे अनेकों को मृत्य से मुलखात करने वाले मौत की खाई से परिचित उस चट्टान को भी परास्त होते हुये देखा ।

अपने घर जब हिरकणी पहूँची तो मानो कालचक्र पर यह अंकित हुवा की संकट के घडी में बाळासाठी  निर्भयता, अनुपम धैर्य और अतुलनीय साहस ही माँ का संपूर्ण रूप होता है ।

इसी का पुनः उदाहरण मुंबई ने 22 मार्च 2017 को अनुभव किया ।

वैसे मुंबई के आरे कोलोनी , फिल्म सिटी यह आज भी घने जंगल से बसा हुवा क्षेत्र है ।

गिना चुना जनजाति समाज बरसो इस क्षेत्र में बसा हुवा है । प्रकृती की गोद में आज भी गुजराण करते हुये इर्द गिरद सिमेंट के जंगल से प्रभावित हो रहा है ।

मगर रोजी रोटी की चक्कर में परिस्थिती से झुजते हुये जीवन ग्यापित कर रहे है ।

हाल ही में विश्व पटल पर नगरिय जीवन बस्ती से सटीक एवं खुलेआम जुडे हुये खतरनाक तेंडुओ में इसी नॅशनल पार्क क्षेत्र की फोटो एवं विडिओ चर्चा का विषय बनी थी ।

माँ की गोद में लेटे हुये सूअर के  बच्चे को दबोचकर इमारत की सुरक्षा दिवार से भागता हुवा  तेंडुआ भी बहुत लोगो ने देखा होगा ।

सौ प्रमिला वासुदेव रिंजड उस रात 9 बजे अंधेरे में अपने आंगण में बैठी ही थी पिछे अपने 3 साल बच्चे प्रणय की आहट सुनी और उसकी तरफ देखते ही देखते रह गयी ।।।। सामने का दृश्य अति भयावह , दर्दनाक था ।  उसके सामने ही दौडकर एक तेंदूये ने
पल भर  में बेटे पर आक्रमण कर दिया था।

शेर उसे पुरी तरह से दबोच ले इसके पहले ही पुरी ताकत से माँ प्रमिला ने शेर पर हल्ला बोल दिया शोर और आकस्मिक प्रहार के कारण शेर को प्रणय को छोडकर दुमदबाकर भागना पडा ।
सदर घटना जोगेश्वरी येथील चाफेच्या पाडयावर घडली ।

पुन्हा एकदा बाळासाठी काहीही साहस  करायला आई सदैव तत्पर  असते हेच सिध्द झाले ।

त्या वीर मातेला प्रत्यक्ष भेटून वंदन करण्याचे भाग्य मला सर्वश्री रमेश म्हात्रे, जयंत कंदारकर आणि पंकज पाठक मुळे प्राप्त झाले । स्थानिक श्री बाळकृष्ण मालुंजकर यांचे साहाय्य लाभले ।